मुंबई ४ डिसेंबर, २०१७ : सरस्वती मालिकेमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनपेक्षित घटना घडत आहेत. सरस्वतीचा खून होणे,
राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे,
देविकाचे अचानक वाडा सोडून जाणे,
या सगळ्या घटनांमुळे मालिकेला नक्कीच वेगळी कलाटणी मिळाली. विद्युलने आजवर भुजंगच्या मदतीने रचलेली सगळी षड्यंत्र यशस्वी झाली. पण,
दुर्गाच्या बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडला. तिच्या प्रत्येक कारस्थानांना,
चालींना दुर्गाने उलटून लावले. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना आता अजून एक सरप्राईझ आहे. त्यांची लाडकी सरस्वती,
मोठ्या मालकांची सरू मालिकेमध्ये परतणार आहे. सरस्वतीच्या परतण्याने आता मालिकेमध्ये कोणते नवे वळण मिळणार आहे ?
राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येणार का ?
विद्युल कोणती नवी खेळी खेळणार ?
दुर्गा सरस्वती आणि राघव यांना एकत्र येऊ देईल ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत सरस्वती मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती सोम ते शनि संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.
भैरवकर वाड्यावर बऱ्याच गोष्टी घडत असतानाच, देविका वाडा सोडून गेली. विद्युल आणि भुजंग यांना वाड्याच्या कागदपत्रांवर दुर्गाची स्वाक्षरी हवी असल्याने या दोघांनी दुर्गाला भैरवकर वाड्यावर आणले. याचदरम्यान, दुर्गाला सरस्वतीबद्दल सगळी माहिती हळूहळू मिळू लागली. सरस्वती कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, तिचं आणि राघवचं नातं कसं होतं हे सगळं दुर्गाला कळत. त्याचबरोबर दुर्गाला विद्युल आणि भुजंग यांच्या कारस्थानाबद्दल देखील सुगावा लागतो. ती या दोघांच्या कुठल्याही म्हणण्यामध्ये येत नाही, कुठलही कामं ऐकत नाही आणि यामुळेच भुजंग आणि विद्युल तिला मारण्याचा कट रचतात. हे सुरु असतानाच वाड्यावर दुर्गाच्या अक्का येतात. आता अक्का आणि दुर्गा मिळून वाड्यामध्ये काय करतील ? कसा विद्युल आणि भुजंग यांचा कट उधळून लावतील हे बघण्यासारखे असणार आहे.
मालिकेमध्ये इतक्या घटना घडत असताना राघवची सरू परतणार आहे. सरस्वती एका वेगळ्याच रुपात मालिकेमध्ये परतणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे. त्या घरामध्ये एक छकुली आहे, तिचे वडील आहेत. या लहान छकुलीची भूमिका गार्गी जोशी साकारणार आहे. सरस्वती मालिकेमध्ये परतण्याने काय घडेल ? या नव्या घरामध्ये ती कशी पोहचली ? तिला कोणी वाचवलं ? सरस्वती बरोबर या काही महिन्यांमध्ये काय घडलं ? दुर्गा आणि सरस्वती एकच आहेत का ? राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येतील का ? मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? हे जाणून घेण्यासाठी बघा “सरस्वती” सोम ते शनि संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.
Related Posts :
UC Browser Launches India’s first Women-only Mobile News Channel
New Delhi, April 12, 2018 : UC Browser, India’s No.1 mobile browser from UC Business Group, Alibaba Digital Media and Enter… Read More...
Celebrate 39 years of Basu Chatterjee’s classic as Zee Classic airs ‘Baton Baton Mein’ under ‘India’s Finest Films’ on 13th April 2018 at 10 PM
What is it with men and marriage? Why are they so scared of tying the knot? They are so ecstatic romancing the pretty damsel, but when i… Read More...
Malaysia Data Centre Market Outlook to 2022… Read More...
XLRI Holds 16th Graduation Ceremony of Executive Diploma Programmes
649 students of XLRI’s Virtual Interactive Learning (VIL), Executive Diploma in Human Resource Management Programme (EDHRM), Postgraduate … Read More...
Rakesh Bharti Mittal New CII President - Government has done its part, industry must invest now / GDP Growth for 2018-19 Pegged at 7.3-7.7% / CII to set up 6 new Model Career Centers and 3 new international offices
Mumbai
12 April 2018
Mr Rakesh Bharti Mittal, President, Confederation of Indian Industry (CII), complimented the Government on its… Read More...