स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्षवेधून घेतले आहे.अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथावेगळी आहे.
कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एकभाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं. जात बघून प्रेमात पडता येत नाही. पण अशा प्रेमाचे लग्नातरुपांतर होताना होणारा संघर्ष आज आधुनिकतेच्या जगातही कायम आहे. हा संघर्ष टाळता येऊच शकणारनाही का? हा महत्वाचा प्रश्न खूप संयत आणि वास्तवदर्शी पद्धतीने या मालिकेतून उलगडत आहे.विशेषम्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे,पण ते मांडतानाकुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वातदीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरतेआहे.
संकटातून मार्ग काढणाऱ्या,प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या अक्कासाहेब,सत्यजित आणि तेजस्विनीच्याप्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अक्कासाहेबांच्या सरदेशमुखकुटुंबासोबत श्रीकांत देसाई,मयूर खांडगे,आरती मोरे,अमित खेडेकर,संदीप जुवाटकर,नीता वझे,फ्रान्सिसऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.