बालक-पालक’या सुपरहिट चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेतारितेश देशमुख ही जोडी पुन्हा या चित्रपटाने एकत्र आली . सिनेमाच्या संकल्पनेविषयी रवी जाधव म्हणाले , ‘मीनटरंग सिनेमावर काम करत होतो तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून बँजोचा विषय माझ्या डोक्यात घोळतहोता. मला भारतातील रस्त्यांवरच्या कलाकारांसाठी काहीतरी करायचे होते, कारण त्यांना त्यांची गुणवत्ता सादरकरण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही आणि पयार्याने त्यांच्या कलेला आदरही मिळत नाही. आपण जॅझ आणि हिप-हॉपबद्दल सतत बोलतो, पण हे प्रकारही स्ट्रीट आर्टचाच एक भाग आहेत आणि काही महान पॉप स्टार्सहीरस्त्यावरूनच शिखरावर पोहोचले आहेत. मला लक्षात आले की, बऱ्याच लोकांना ‘बँजो’वाद्य किंवा बँजोकलाकारांबद्दल काहीही माहिती नाही.’
सिनेमात बँड नायकाची भूमिका करणारा रितेश देशमुख म्हणाला, ‘बँजो या स्ट्रीट आर्ट प्रकाराला आदरमिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा सिनेमा रस्त्यावरचे सर्व कलाकार, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या भावनांचेप्रतिबिंब आहे.’
या सिनेमात तराट (रितेश देशमुख), ग्रीस (धर्मेश येलांडे), पेपर (आदित्य कुमार) आणि वाज्या (राम मेनन) या चारबँजो वादकांची कहाणी पाहायला मिळणार आहे, जे मुंबईच्या निम्न वर्गात राहात असतात आणि अमेरिकेतराहाणाऱ्या क्रिस्टिनाच्या (नर्गीस फाख्री) रुपाने त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळते...