‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील माधुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कविता लाड यांनी काही अनुभव शेअर केले ज्यामुळे त्यांना “नवरा असावा तर असा” म्हणावेच लागले “लग्नानंतर दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येतात. माझी लाइफस्टाईल अशी होती कि, सगळं वेळेत करायचे, पण नवरा advertising क्ष्रेत्रामधला असल्याने त्याची लाइफस्टाईल ही खूपच वेगळी होती. त्याला मला कधीकधी घेऊन पार्टीला जायचं असायचं आणि मी जाऊ नव्हती शकतं ज्याचं कारण एकच “शुटिंग”. पण, मुलगा झाल्यानंतर मी प्रायोगिक नाटकांमध्ये कामं करत होते, तेंव्हा विंगमध्ये माझा नवरा छोट्याश्या बाळाला घेऊन उभा रहायचा, त्याला खेळवायचा, तू कामं कर मी सांभाळतो बाळाला असं म्हणायचा. माझ्या आयुष्यात हे जे क्षण येतं गेले त्या प्रत्येक क्षणी मला वाटले कि, “नवरा असावा तर असा”.
‘तू माझा सांगाती’ मालिकेमधील “आवली’ म्हणते,” नवरा बायकोमधील भांडण तर सगळ्यांच माहिती आहेत. आमच्यात पण होतात, पण त्याहून महत्वाचं मला वाटत कि, माझा नवरा जे माझे लाड करतो म्हणजे माझं खूप हेक्टिक शेड्युल असेल तर मला सेटवरून घ्यायला येतो, माझ्यासाठी घरामधली छोटी – मोठी कामं करतो हे मला कुठे तरी खूपच महत्वाचं वाटतं. या गोष्टींमुळे मला पण वाटतं “नवरा असावा तर असा”